माझा भारत देश महान निबंध मराठी | Maza Bharat Desh Mahan Nibandh In Marathi
भारतीय नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. मी ज्या देशांमध्ये राहतो त्या देशाचे नाव भारत देश असे आहे. माझा देश आहे मला खूप आवडतो. त्यामुळे माझ्या मते माझा भारत देश महान आहे. माझा भारत देश जगातील सर्व देश आणि पैकी सर्वात मोठे लोकशाही राज्य आहे.
माझ्या भारत देशाचा इतिहास हा खूप मोठा प्राचीन आणि सांस्कृतिक वारसा चे नेम जोपासलेला आहे. प्राचीन भारतीय संस्कृति ही माझ्या भारत देशाला लाभलेली सर्वात मोठी देणगी आहे. हजारो तेजस्वी परंपरा माझ्या भारताला लाभली आहे.
भारतात राहणारे विविध जातीचे धर्माचे लोक आणि भारताच्या प्रत्येक राज्याची विशेष अशी बोलली जाणारी भाषा हे माझ्या भारत देशाचे वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा साहित्य आणि समृद्ध आहेत.
हिंदी भाषा ही माझ्या भारत देशाची राष्ट्रभाषा आहे तर सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य आहे. जनगणमन हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. विश्वविजयी असा तिरंगा माझ्या भारताचा राष्ट्रध्वज आहे.
संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे अशोकचक्र ही भारताची अस्मिता आहे. रुपया हे भारताचे चलन आहे. कमळ हे माझ्या भारताचे राष्ट्रीय फूल आहे तर वाघ हा माझ्या भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
135 करोड लोकसंख्या असलेला लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा माझा भारत देशामध्ये विविध जातीचे, पंथाचे आणि धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. विविधत जाती-धर्म याचा रितीरिवाज आणि सांस्कृतिक आविष्कार अशी भिन्नता लाभलेली आहे. या मुळेच माझ्या भारत देशाला विविधता मध्ये एकता असणारा देश म्हणून देखील ओळखले जाते.
भारत देशाच्या प्रमाणे विविध जाती धर्माचे लोक लाभले आहेत त्याप्रमाणे ऋतूनुसार बदलणारे वातावरण देखील लाभले आहे. मोसमी वाऱ्यांची वरदान, गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी अशा पवित्र नद्या, हिमालय सारखा पर्वत, काश्मीर- महाबळेश्वर सारखी निसर्गाची सुंदर देण तिचा धार्मिक ठिकाणे यांसारख्या पवित्र अशा मातृभूमेने माझ्या भारत देशाला आणखीनच महान बनवले आहे.
दीडशे वर्षे ब्रिटिशांच्या राजवटीखाली गुलाम करणारा माझा भारत देश आज जगामधील विकसनशील देशाच्या यादीमध्ये सामाविष्ट झाला आहे. जसा काळ बदलत गेला तसा माझा भारत देशाचे रूप देखील बदलत गेले.
माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी कित्येक महान क्रांतिकारी आणि पुरुषाने आपल्या प्राणांची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या बलिदानाच्या रक्ताने माझ्या भारत देशाला महान बनविले आहे.
स्वतः च्या प्राणाचा त्याग करून माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक महान धडपडले अखेर माझ्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. माझा भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी माझा भारत देश प्रजासत्ताक झाला व माझा भारत देशात संविधान लागू झाले.
तसेच माझ्या भारत भूमी मध्ये अनेक रत्नांनी जन्म घेतला. सम्राट अशोक, गौतम बुद्ध, महावीर अशा अनेक रत्नांनी माझा भारत भूमीला पावन केले. दया, क्षमा, शांतता, समाज प्रबोधन घडवणाऱ्या संतांचा वारसा माझ्या भारत देशाला लाभला. अशा या माझ्या पावन आणि विविधतेने नटलेल्या भारतावर जेव्हा परराष्ट्रीय देशाने आक्रमण केले तेव्हा माझ्या भारतातील सर्व जनता त्यांना तोंड देण्यासाठी एकत्रितपणे उभा राहिले.
आजच्या आधुनिक भारताने तर सर्व क्षेत्रांमध्ये आपली कामगिरी दाखवली आहेत खेळापासून ते चित्रपट सृष्टी पर्यंत माझा भारत देश अव्वल दर्जावर आहे. माझ्या भारत देशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे माझा भारत देश कृषिप्रधान देश आहे. माझा भारत देशातील बहुतांश जनता हे शेतीवर अवलंबून आहे.
स्वतः च्या कर्तब बाजीवर माझ्या भारत देशातील लोकांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली कामगिरी बजावली आहे. आज माझ्या भारत देशामध्ये विविध उद्योगधंदे कंपन्या व्यवसायात अस्तित्वाला आले आहेत.
एवढेच नसून सेवा आणि शिक्षण क्षेत्राने तर माझा भारतामध्ये खूप प्रगती केलेली आहे. आज माझ्या भारत देशामध्ये डिजिटल स्वरूपाचे शिक्षण दिले जाते जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान मिळावे व तरुण पिढीने देशाच्या प्रगतीसाठी काहीतरी नवीन कार्य करून दाखवावे.
अलीकडच्या काही वर्षांपासून माझ्या भारत देशाला स्वच्छ भारत व सुंदर भारत करण्याचा प्रयत्न चालू आहे. तसेच माझ्या भारत देशातील प्रत्येक जनता आत्मनिर्भर आणि स्वावलंबी कसे बनते याकडे लक्ष केंद्रित केले जात आहे.
जगातील अनेक कमजोर देशांना क्षमता मिळवून देण्यासाठी माझा भारत देश कार्यरत आहे. एक उगवती महासत्ता म्हणून संपूर्ण जग माझ्या भारताकडे पाहत आहे. म्हणून तर जागतिक प्रश्नाच्या वेळी जगाला भारत देशाचे मत जाणून घ्यावे लागत आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर वावरणार्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एकच मंत्र घुमत आहे ते म्हणजे माझा भारत महान!
तर मित्रांनो ! ” माझा भारत देश महान निबंध मराठी | Maza Bharat Desh Mahan Nibandh In Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- वृक्ष आपले मित्र मराठी निबंध
- माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी
- मराठी बाराखडी इंग्रजीत
- माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी
- माझा आवडता सण होळी निबंध
धन्यवाद मित्रांनो !
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
- Privacy Policy
- Terms and Conditions
माझा भारत महान निबंध मराठी | Maza Bharat Mahan Nibandh Marathi
Set 1: माझा भारत महान निबंध मराठी – maza bharat mahan nibandh marathi.
मी भारतीय आहे, याचा मला अभिमान आहे. माझा भारत हा प्राचीन देश आहे. त्याचा इतिहास वैभवशाली आहे. प्राचीन काळात भारत समृद्ध व ज्ञानात अग्रेसर होता.
भारतात भौगोलिक विविधता आहे. भारताच्या तीन बाजूंनी सागर व उत्तरेला उत्तुंग हिमालयाची सीमा आहे. भारतातील हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असल्याने धान्ये, फळे, भाज्या, फुले यांच्यातही विविधता आढळते.
भारत हा जसा वीरांचा, शूरांचा देश आहे, तसाच तो संतांचाही देश आहे. भारतात विविध धर्माचे लोक राहतात व ते भिन्न भाषा बोलतात. या सर्व भाषांतील साहित्य समृद्ध आहे.
भारताने दीडशे वर्षे गुलामगिरी साहिली. तेव्हा एकजूट करून भारतीयांनी लढा दिला व १९४७ साली स्वातंत्र्य मिळवले. स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत विकास साधला. या विशाल देशाला अनेक नैसर्गिक आपत्तींना व मानवनिर्मित संकटांना वेळोवेळी तोंड दयावे लागले आहे. पण सर्व भारतीय संघटित होऊन मोठ्या जिद्दीने त्यांवर मात करतात.
मनुष्यबळ ही भारताची मोठी शक्ती आहे. त्यामुळे भारत विविध क्षेत्रांत सतत प्रगती साधत आहे. आज अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वावलंबी आहे. औदयोगिक, वैज्ञानिक क्षेत्रांत जगात अग्रेसर बनला आहे. माझा भारत खरोखर महान आहे.
Set 2: माझा भारत महान निबंध मराठी – Maza Bharat Mahan Nibandh Marathi
भारत माझा देश आहे. त्यास हिंदूस्थान असेही म्हटले जाते. भारत आशिया खंडात आहे. याच्या उतरेला हिमालय पर्वत, दक्षिणेला, हिंदी महासागर, पश्चिमेला अरबी समुद्र तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. पाकिस्तान, बांगला देश, चीन हे शेजारी राष्ट्र आहेत. येथील ७० % लोक खेड्यांत राहतात.
व चीननंतर भारत सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश आहे. बहुसंख्य हिंदू असणारे राष्ट्र असूनही इथे सर्वधर्मसमभाव आहे. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन सगळेच आपापसांत प्रेमाने राहतात. सर्वांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. इथे अनेक जाती व अनेक भाषा बोलल्या जातात. परंतु राष्ट्रभाषा मात्र हिंदी आहे. अनेक प्रकारचे रीतिरिवाज, वेशभूषा येथे दिसते. राजा हरिश्चंद्र, शिबी राजा, रामासारख्या सत्यवचनी राजांनी या धरतीला पवित्र केले. चाणक्यासारखा मुत्सद्दी आणि विदुरासारखे नीतिमान पण या भारतात होऊन गेले.
भारतात गंगा, यमुना, सरस्वतीसारख्या नद्या, हिमालय पर्वत, जगातील सात आश्चर्यापैकी एक ताज महाल, लाल किल्ला, अजिंठा वेरुळच्या लेण्या, कुतुबमिनार ही देशातील वास्तुकलेची उत्कृष्ट उदाहरणे होत. जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे गाव चेरापुंजी भारतातलेच. निसर्ग सौंदर्याचा अतिसुंदर आविष्कार काश्मीर, सिमला, मसुरी, माऊंट अबू या सारख्या थंड हवेच्या ठिकाणी पाहावयास मिळतो. विदेशी पर्यटकांना ही सर्व ठिकाणे आकर्षित करतात.
येथे लोखंड, कोळसा, तांबे, नैसर्गिक वायू, युरेनियम इत्यादी खनिजे विपुल प्रमाणावर सापडतात. आज भारत औद्योगिक क्षेत्रातही प्रगतीच्या मार्गावर आहे. टी.व्ही. रेडिओ. मोटारी, बस, ट्रक, रेल्वे, जहाजे, दारुगोळा, क्षेपणास्त्र निर्मितीत भारत स्वयंपूर्ण झाला आहे.
भारत हा जगातील सर्वात प्रमुख लोकशाही देश आहे. भारताला आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. सर्वांगीण प्रगती झाल्यामुळे भारत आज आशिया खंडातील एक महत्त्वाचा देश बनला आहे.
Set 3: माझा देश भारत निबंध मराठी – Maza Desh Bharat Nibandh Marathi
माझ्या देशाचे नाव भारत आहे. देशात शंभर करोड पेक्षा जास्त स्त्री-पुरुष-बालके राहातात. हा त्या सर्वांचा देश आहे. ही लोकसंख्याच देशाची ताकद आहे, मर्यादा आहे, मर्यादा देखील, चीन नंतर भारतच लोकसंख्येसाठी पहिल्या नंबरवर असेल. जगात सहा व्यक्तीनंतर एक व्यक्ती भारतीय आहे.
भारत महान आहे, विशाल आहे, खरोखरोच अद्भूत, जगातील सर्व धर्माची माणसं इथं राहातात. हिंदू, बौद्ध, जैन, शिख धर्म तर इथेच जन्माला आले. विविधतेत एकता हे भारताचे विलक्षण उदाहरण आहे. उत्तीरेत काशीपासून दक्षिण कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिमेत गुजरातपासून पूर्वेकडे गुवाहाटीपर्यंत भारत एक आहे. उत्तरेस पर्वतराज हिमालय थाटात उभा आहे. त्याची शिखरे जगातील सर्वात उंच शिखरे आहेत. ते नेहमी बर्फाने अलंकृत होत असतात. याच्या खाली विशाल सागर आहे. हिमालयातून अनेक नद्यांचा उगम होतो. इथे सर्व प्रकारचे हवामान आहे.
भारताचा इतिहास फारच प्राचीन आहे. सिंधू संस्कृती आणि रामायण काळापासून आतापर्यंत हजारो वर्षाचा इतिहास आहे. प्राचीन काळात याला सोन्याची खान म्हटले जायचे. आज हा प्रगतीच्या मार्गावरून मार्गक्रमण करू लागला आहे. भारताने अनेक महान पुरूषांना जन्म दिला आहे. प्राचीन काळात गौतम बुद्ध झाले तर वर्तमान काळात महात्मा गांधी. या दरम्यान शेकडो महान स्त्री-पुरुष जन्मले.
- माझा भाऊ निबंध मराठी
- माझा छंद बागकाम निबंध मराठी
- माझा गाजलेला छंद निबंध मराठी
- माझा आवडता सण निबंध मराठी
- माझा आवडता सण विजया दशमी निबंध
- माझा आवडता सण गुढीपाडवा निबंध
- माझा आवडता सण गणेश चतुर्थी निबंध मराठी
- माझा आवडता विषय मराठी निबंध
- माझा आवडता विषय इतिहास
- माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध
- माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध
- माझा आवडता पक्षी कोकिळा निबंध मराठी
- माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी
Leave a Reply Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
माझा देश महान निबंध मराठी | Bharat Desh Mahan Nibandh Marathi
Bharat Desh Mahan Nibandh Marathi : आज आपण भारत देश महान निबंध या विषयावर निबंधलेखण करणार आहोत.
आपला महान भारत देश अनेक क्षेत्रांत आघाडीवर आहे. देशाचे नाव ऐकल्यावर मान अभिमानाने उंचावते. भारतात अनेक जातीचे, धर्माचे लोक एकजुटीने मिळून राहतात. भारतामध्ये आढळणार्या विविधतेच त्याची एकता आहे.
दिलेला Bharat Desh Mahan Marathi Nibandh तुम्ही शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठीही वापरू शकता.
चला तर मग या निबंधद्वारे जाणून घेऊया अधिक माहिती: Maza Bharat Mahan Nibandh Marathi
Table of Contents
माझा देश महान निबंध 10 ओळी (100 शब्द)
- भारत माझा देश आहे. भारताचा नागरिक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
- भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे.
- माझ्या देशाला समृद्ध असा प्राचीन, ऐतिहासिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा लाभला आहे.
- प्रांत, जाती, भाषा, वेशभूषा, आहार-विहार यात देशात कमालीची विविधता आहे.
- या विविधेतही देशातील एकता व अखंडता अवाधित आहे.
- हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, तर तिरंगा हा राष्ट्रध्वज आहे.
- जन गण मन हे देशाचे राष्ट्रगीत असून, सत्यमेव जयते हे देशाचे बोधवाक्य आहे.
- संविधान हा देशाचा आत्मा असून त्यानुसार देशाचा सर्व कारभार चालतो.
- माझा देश विकसनशील असून तंत्राद्यान, आरोग्य, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात भरारी घेत आहे.
- माझा देश माझा अभिमान आणि माझा देश माझी जबाबदारी आहे.
माझा देश महान कविता
माझा भारत देश माझा अभिमान :
चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान भारत देश महान, भारत देश महान ||धृ.|| हिमालयची हिमशिखरे ती | भारतभूच्या शिरी डोलती | गंगा, यमुना आणि गोमती | घालिती पवित्र स्नान ||१|| इतिहास नवा हा बलिदानाचा | शौर्याचा अन् पराक्रमाचा | समतेचा अन् विश्वशांतीचा | जागवी राष्ट्रभिमान ||२|| शौर्याने जे वीरचि लढले | रणांगणी ते पावण झाले | भारतभूचे स्वप्न रंगले | चढवूनि उंच निशाण ||३||
भारत देश महान निबंध 300 शब्द | Bharat Desh Mahan Nibandh
मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे. ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ ही प्रतिज्ञा वाचताना माझा ऊर अभिमानाने भरून येतो.
भारत हा प्राचीन देश आहे. त्याचा इतिहास वैभवशाली आहे. प्राचीन काळात भारत समृद्ध व द्यानात अग्रेसर होता. भारताला सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे.
जगातील विद्वान भारतातील तक्षशिला, नालंदा या विद्यापीठांत द्यान घेण्यासाठी येत असत. विद्यांप्रमाणे कलांमध्येही माझ्या भारताची मोठी कामगिरी आहे. | Bharat Desh Mahan Nibandh Marathi
भारतात भौगोलिक विविधता आहे. उत्तरेला उत्तुंग हिमालयाची सीमा आहे. तसेच भारतातील हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असल्याने धान्ये, फळे, भाज्या यांच्यातही विभिन्नता आढळते.
भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात व ते भिन्न भाषा बोलतात. या सर्व भाषांतील साहित्य समृद्ध आहे.
भारत हा जसा वीरांचा, शुरांचा देश आहे तसाच तो संतांचाही देश आहे. अनेक थोर समाजसुधारक व विचारवंत येथे जन्मले. या सार्यांनी भारतीय जनतेत उच्च, उदात्त मूल्ये रुजवली, म्हणूनच अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने भारताने आपले स्वातंत्र्य मिळवले.
भारताने दीडशे वर्षे गुलामगिरी सहन केली आणि एकजूट होऊन भारतीयांनी लढा दिला व १९४७ साली स्वातंत्र्य मिळवले. | Bharat Desh Mahan Nibandh Marathi
स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षांत भारताने विविध क्षेत्रात विकास साधला. आजही माझा भारत महान सतत प्रगती करत आहे.
विविध जाती, विविध धर्म व विविध भाषा ही माझ्या भारताची वैशिष्ठ्ये आहेत. येथे सर्व भारतीय प्रेमाने एकत्र राहतात.
कधीकधी काही समाजविघातक शक्ति भारतीयांचे हे ऐक्य नष्ट करण्याचा यत्न करतात; पण या देशाचे ऐक्य अबाधित राहिले आहे.
भारताची मोठी शक्ति ही मनुष्यबळ आहे. | Bharat Desh Mahan Nibandh Marathi
हरितक्रांतीच्या मार्गाने जाऊन भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला आहे. श्वेतक्रांती झाल्यामुळे दहयादुधाची लयलूट झाली.
आज औद्योगिक आणि वैद्यानीक क्षेत्रांतही भारत प्रगती करत आहे.
म्हणूनच माझा आधुनिक भारत देश महान आहे. असा भरात देश मला अतिशय प्रिय आहे.
माझा भारत महान |भारत देश निबंध मराठी 8वी
प्राचीन काळी भारताची ही सुवर्णभूमी द्यान आणि वैभव यांनी संपन्न होती. जगाच्या कानाकोपर्यातून अनेक प्रवासी भारतात येत असत. नालंदा, तक्षशिला या ठिकाणी विद्यापीठे होती.
आपल्या महान भारत देशात अनेक राजे होऊन गेले. त्यांनी भारतात स्वराज्य व सुराज्य निर्माण केले.
भारताने वेळोवेळी आपल्या स्वराज्यासाठी संघर्ष केला. महात्मा गांधीजीच्या मार्गदर्शनाखाली प्रबळ इंग्रजी सत्तेविरुद्ध दिलेला लढा हा अविस्मरणीय आहे.
आज एकविसाव्या शतकात भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही नांदत आहे.
भारत हा ‘सुजलाम सुफलाम’ देश आहे. | Bharat Desh Mahan Nibandh Marathi
आपल्या महान भारत देशाला ऋतूंची विविधता लाभली आहे. त्यामुळे भारतात येणाऱ्या उत्पन्नात विविधता असते. फळे, फुले, धान्ये यांत विविधता आढळते.
भारतात अनेक धर्माचे, विविध पंथाचे, जातीचे लोक राहतात. त्याच्या भाषाही विभिन्न आहेत. या विविधतेच माझ्या महान भारताची एकता आहे आणि म्हणूनच माझा देश महान ( Maza Desh Mahan ) आहे.
आज भारत देश अनेक क्षेत्रांत अग्रेसर आहे. मनुष्यबळ ही भारताची प्रचंड शक्ति आहे. धनधान्ये व दूधदुभते यांत भारत स्वावलंबी आहे. औद्योगिक क्षेत्रातही तो सतत प्रगतिशील आहे.
आजच्या संगणकयुगात ‘सॉफ्टवेअर’ च्या क्षेत्रात भारतीय युवकांची कामगिरी आश्चर्यकारक आहे. अंतराळात भारताची कामगिरी लक्षणीय आहे. क्रीडाविश्वात भारतीयांची कामगिरी नेत्रदीपक आहे.
म्हणूनच मी म्हणतो,
‘ माझा देश महान, माझा भारत देश माझा अभिमान ‘
हे देखील वाचा:
- माझा देश मराठी निबंध | Maza Desh Marathi Nibandh
- माझ्या स्वप्नातील भारत निबंध |Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi
माझा भारत देश निबंध |Bharat Desh Mahan Nibandh Marathi
माझा भारत देश माहिती (निबंध):
“जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरियसी”
आपला भारत देश हा विशाल आहे. भारताच्या उत्तरेस हिमालय, पश्चिमेस अरबी समुद्र, आणि दक्षिणेस हिंदी महासागर आहे.
जगातील अतिभव्य असा हिमालय आणि विंध्याचल, सातपुडा व सह्याद्रि यांसारखे पर्वत आपल्या देशात आहेत.
गंगा, यमुना, कृष्णा, नर्मदा, गोदावरी अशा मोठमोठ्या नद्या महान भारतात आहेत. त्यांच्या पाण्यामुळे जमीन सुपीक बनून अनेक पिके, फळे, फुले यांनी भारतभूमी समृद्ध झाली आहे.
अनेक पराक्रमी राजे-महाराजे, धर्मसंस्थापक, संत आणि स्वातंत्र्यासाठी लढणार्या महान विभूति आपल्या देशात होऊन गेल्या. त्यांनी भारताची संस्कृती घडवली, वैभव वाढवले.
भारतात विविध भाषेचे, जातीचे, धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. हिंदी ही आपल्या महान भारताची राष्ट्रभाषा आहे. | Maza Bharat Desh Nibandh in Marathi
द्वारका, काशी, जगन्नाथपुरी, पंढरपूर, शेगाव, शिर्डी यांसारखी पवित्र तीर्थक्षेत्रे येथे आहेत. काश्मीर, गोवा, व केरळच्या सृष्टीसौंदर्याला जगात तोड नाही.
ताजमहाल, कुतुबमिनार या ऐतिहासिक वास्तू आणि अजिंठा वेरूळ सारखी कोरीव लेणी तर जगातील आश्चर्ये ठरली आहेत.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वराज्य मिळाले. आज आपला भारत हा स्वतंत्र प्रजासत्ताक असा देश आहे. भारत आज विद्यानक्षेत्रात, क्रीडाक्षेत्रात व निरनिराळ्या उद्योगधंद्यात प्रगती करत आहे.
अशा या विविधतेने नटलेल्या संपन्न भारताचा प्रत्येकाला हवा अभिमान, म्हणूनच प्रत्येक भारतीयाने म्हणावे..
‘ माझा भारत महान , माझा भारत महान !’
माझा देश माझी जबाबदारी निबंध | Maza Desh Maza Abhiman Nibandh
मंगल, पवित्र, सुजलाम्, आणि सुफलाम् असा महान देश म्हणजे भारत देश. भारत हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मला माझा देश स्वर्गाहुन प्रिय आहे. मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे.
सुंदर है जग मे सबसे, नाम भी न्यारा है जहां जाती भाषा से बढकर, देश प्रेम की धारा है निच्छल, पावन, प्रेम पुराणा, वो भारत देश है हमारा|
द्याते, वक्ते, आणि श्रोते हो. आजच्या विचाराने विस्कटलेल्या, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या, नीतीमत्ता हरवलेल्या समाजात देशाचे भावी आधारस्तंभ समजल्या जाणार्या आजच्या युवपिढीने विचारपूर्वक पाऊल टाकले पाहिजे.
आपल्या राष्ट्राचा विचार करता करता, आपल्या देशाने एक एक गोष्ट पद्धतशिरपणे गमावली आहे.
संपत्ति ..निसर्गसंपती पाठोपाठ संस्कार, स्वाभिमान, आत्मतेज, धर्मशाळेसारख्या झालेल्या या देशाने रामायण आणि महाभारत या महाकाव्यातील संस्कारशीलतेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मौज, मजा, व्यसनाधिनता यांच्या दुष्टचक्रात युवपिढी अडकत गेली. | Bharat Desh Mahan Nibandh Marathi
त्यामुळे या युवपिढीला मला कळकळीचे आवाहन करावेसे वाटते की इतिहासाची जाण व राष्ट्रामातेचे प्रेमाचे भान ठेवूनच जीवन जगायचे म्हटले तर रामायणातील तत्त्वे नक्कीच राष्ट्रउभारणीसाठी प्रेरणास्त्रोत ठरतील.
माझा देश समर्थ भारत बनवायचा असेल तर आजच्या तरुण पिढीमध्ये – लाथ मारीन तिथ पानी काढण्याची धमक त्याच्या रक्तात असावी.
स्वत:च्या कष्टाने मिळवलेली कोंडाभाकरी का असेना ती चालेल, पण दुसर्याच्या आयुष्याची होळी करून मिळवलेली पोळी खाण्याची इच्छा त्याला नसावी. | Maza Bharat Desh Nibandh in Marathi
राष्ट्रपती नितांत आदर असावा त्यासाठी वाटेल ते त्याग करण्याची तयारी असावी.
भारत माझा देश आहे अस आपल्याला म्हणायच असेल तर या देशातील भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरीबी, अस्वच्छता यांसारख्या अनेक समस्या दूर करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा तरच विकसित भारताचा जन्म होईल व आपण अभिमानाने म्हणू –
सारे जहां से अच्छा… हिंदोस्ता हमारा हम बुलबुले है इसकी ये गुलिस्ता हमारा…
मातृभूमीच्या रक्षणाची जबाबदारी आजच्या तरुण पिढीची आहे. त्यामुळे तरुणांनी आपापल्या इच्छेनुसार भूदल, नौदल, हवाई दल मध्ये जावून देशाबद्दल आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.
विद्यान, कला, शिक्षण क्षेत्रात तरुणांनी देशाच्या गरजा भागवल्या पाहिजेत. देशातील अन्नधान्याची कमतरता, रस्त्यांची गरज, वीजनिर्मिती या समस्या तरुण पिढीने जाणून घेतल्या पाहिजेत.
आजची युवा पिढीच देशाला विकासाची नवीन दिशा दाखवू शकते. | Bharat Desh Mahan Nibandh Marathi
शेती, व्यापार, आणि उद्योग क्षेत्रात आधुनिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. हुंडा न घेता लग्न करण्याचा निश्चय केला पाहिजे.
यासाठी देशातील प्रत्येकाने चांगला नेता, सेनापती, शिक्षक, डॉक्टर, सैनिक, कलाकार बनून देशाच्या विकासासाठी आपले योगदान दिले पाहिजे.
‘ माझा देश माझी जबाबदारी ‘ हे लक्षात ठेवून वाईट संगतीला बळी न पडता चांगले व्यक्तिमत्व घडवून देशाप्रती आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.
काही महत्वाचे निबंध:
- माझी आई बेस्ट मराठी निबंध {2023} Mazi Aai Nibandh in Marathi
- माझे बाबा अप्रतिम निबंध | Maze Baba Nibandh in Marathi
- माझी शाळा मराठी निबंध | Mazi Shala Marathi Nibandh
- पाऊस पडला नाही तर | Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh
- मी पक्षी झालो तर बेस्ट निबंध {2023} Mi Pakshi Zalo Tar Nibandh
निष्कर्ष: Bharat Desh Mahan Nibandh Marathi
विद्यार्थ्यांनो तुम्हाला ‘ भारत देश महान निबंध ‘ कसा वाटला हे आम्हाला खाली कमेन्ट करून सांगा. जर तुम्हाला Bharat Desh Mahan Nibandh Marathi आवडला असेल तर तुमच्या वर्ग मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा.
दिलेला निबंध तुम्ही खलील विषयांवर देखील लिहू शकता.
माझा भारत देश माहिती , माझा आधुनिक भारत , माझा भारत म्हणजे स्वराज्य , माझा प्रिय भारत निबंध , माझा देश माझी जबाबदारी निबंध , भारत देश निबंध , भारत देश महान निबंध , माझा देश निबंध मराठी 8वी .
मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
My Country Essay in Marathi, Maza Bharat Desh Nibandh, My India देश
- by Pratiksha More
- Mar 19, 2024 Mar 19, 2024
- 22 Comments
Maza Bharat Desh Nibandh in Marathi Language
Maza bharat mahan essay : माझा देश निबंध.
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.” अशी प्रतिज्ञा आपण शाळेमध्ये सकाळी प्रार्थनेच्या वेळी घेतो. कधी विचार केला आहे का, की हा माझा देश कसा आहे? इतर देशांपेक्षा तो का वेगळा आहे? आणि कुणालाही भारतीय आहे म्हंटल्यावर इतका अभिमान का वाटतो? कारण माझ्या देशात इतकी विविधता आहे जी कुठल्याच देशात नाही!
एका भारतात निसर्ग, प्राणी, मानव, त्यांच्या चालीरीती, दिसणे, भाषा ह्यामध्ये एव्हडी विविधता आहे की जर पूर्ण भारत फिरलो तर सगळे जग बघितल्यासारखे होईल. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपण युरोप, चीन, अफगाणिस्तान आणि साउथ आफ्रिका सगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करतील अशी माणसे आहेत. काश्मीरला युरोप सारखा बर्फ आणि गोरी पान माणसे आहेत, आसाम मणिपुरी ला चिनी लोकांसारखी माणसे आहेत, पंजाब मध्ये अफगाणिस्तानी लोकांसारखी पंजाबी आहेत तर अगदी दक्षिणेला काळी माणसे आहेत. अरब देशासारखे राजस्थानात वाळवंट आहे तर काझीरंगा ला अफ्रिकन सफारी सारखा पार्क आहे. काय नाही आहे माझ्या देशात?
खरोखर अभिमान वाटण्यासारखी, अनादि काळापासून आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. जगातल्या सगळ्या जुन्या संस्कृतींपैकी आपली एक संस्कृती आहे. किती समृद्ध संस्कृती आणि समृद्ध जीवन पद्धती होती आपल्या भारतामध्ये! असे म्हणत की, पूर्वी आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत होता. ह्यात अतिशयोक्ती जरी असली तरी, हे खरे आहे की पूर्वी खरोखर भारतामध्ये अतिशय श्रीमंती होती. इंग्लंड, फ्रांस, पोर्तुगाल, स्पेन अशा देशांतून लोक व्यापारासाठी येत होते आणि थैल्या भरून-भरून संपत्ति घेऊन जात होते.
त्यांचीच वाईट नजर भारताच्या भरभराटीला लागली आणि सुवर्ण काळ ओसरायला लागला. एखाद्या फळांनी लगडलेल्या झाडाला व्रात्य पोरांनी दगड मारून फळे तोडावीत तसे वायव्येच्या खैबर खिंडीतून अफगाणी, हिमालयातून मंगोलियन, दक्षिणेकडून पोर्तुगीज, इंग्रज आणि फ्रेंच ह्या लोकांनी हल्ले करून संपत्ति लुटून न्यायला सुरुवात केली. त्यांच्या यशाचे कारण त्यांचा पराक्रम नसून भारतातली दुही कारणीभूत झाली. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारतात १८ पगड जाती जमातीचे, रंग रुपाचे आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. त्या वेळेला त्यांचे एकमेकांशी सलोख्याचे संबंध नव्हते. राजे विलासी होते आणि आपापसातच लढत होते. ह्या दुहीचा नेमका फायदा ब्रिटीशांनी उचलला आणि आपल्या देशावर तब्बल दिडशे वर्ष राज्य केले. आपली सगळी संपत्ति लुटून इंग्लंडला नेली. राज्ये खालसा केली. हेच काय तर आपला जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात विराजमान झाला. त्यांच्याच काळात देशाचे दोन तुकडे पाडून ‘पाकिस्थान’ जन्माला आला.
जरी ब्रिटीशांनी भारताची संपत्ति लुटून नेली, तरी भारतात जन्माला येणाऱ्या प्रखर देश भक्ती असलेल्या वीरांना ते काही करू शकले नाही. भारत भूमी ही वीरांना, साधू संतांना, महान व प्रचंड बुद्धिमान लोकांना जन्माला घालणारी भूमी आहे. भारताने शून्याचा शोध लावला म्हणून जग आज संख्या मोजत आहेत.
पूर्वीच्या भारतीयांनी इतिहास, भूगोल शास्त्र, खगोलशास्त्र, गणित, विज्ञान, आयुर्वेद अशा सगळ्या शस्त्रांमध्ये इतर देशांपेक्षा खूप प्रगती केली होती. साऱ्या जगातून भारतात शिकण्यासाठी लोक येत होते. तक्षशीला आणि नालंदा, या विद्यापीठांना आजच्या ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड चे महत्व प्राप्त झाले होते. त्याच बुद्धिमत्तेचा वारसा असलेल्या लोकमान्य टिळक, शामाप्रसाद मुखर्जी, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा प्रखर राष्ट्र भक्ती असलेल्या वीरांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि इतकी वर्षे वेगवेगळे असलेले भारतातील लोक कॉंग्रेसच्या एकाच झेंड्याखाली इंग्रजांशी लढायला एकत्र झाले. तेव्हा आपला देश हा पूर्णपणे खऱ्या अर्थानी अखंड भारत झाला.
सगळ्या जाती धर्माच्या आणि वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या लोकांनी खांद्याला खांदा लावून ब्रिटीशांशी स्वातंत्र्य युद्ध केले आणि शेवटी ब्रिटीशांनी हार मानून आपला देश १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला परत केला. ब्रिटिशांशी दिलेल्या लढ्यानंतर ‘विविधतेत एकता’ ही संकल्पना भारतीय मनात उदयाला आली आणि स्वतंत्र भारतात आपले लोकशाही पद्धतीने राज्य सुरू झाले. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणी मुळे आपल्या देशाचे खूप नुकसान झाले. त्या मुळे सगळ्या देशाने कंबर कसून हयातून बाहेर पडायचा संकल्प केला, आणि भारताला पूर्वीचे सुवर्ण युग प्राप्त करून देण्याचा निश्चय केला.
विद्वानांची भारतात खाणच आहे; त्या मुळे आपण आता अवकाशयान सोडण्या इतपत प्रगती करू शकलो. डॉक्टर अब्दुल कलाम हे त्यापैकीच एक. त्यांच्यामुळे आपण आता अमेरिकेच्या तोडीस तोड खगोलशास्त्रात प्रगती करू शकतो. पुरेसे आधुनिक सैन्य बळ आणि शस्त्र बळ नसेल तर कुठलाही देश तग धरू शकणार नाही हे ओळखून द्रष्ट्या राज्यकर्त्यांनी सैन्य बळ आणि शस्त्र बळ वाढवून कुठल्याही आक्रमणाला तोंड देण्या इतपत भारताची प्रगती केली आहे.
उद्योगांमध्ये सुद्धा टाटा, जिंदाल, अंबानी ह्या सारख्या लोकांनी भारताचे स्थान उंचावर नेऊन ठेवले आहे. ‘जय जवान जय किसान’ हे आपल्या देशाचे ब्रीद वाक्य आहे; त्या मुळे शेती उद्योगातही नव नवीन शोध लावून प्रचंड प्रगती झाली आहे.
भारतात सगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र नांदत आहेत, पण एकी मात्र अजून दूरच आहे. अजूनही देशामध्ये जाती-धर्मावरून दंगे धोपे चालू आहेत. उत्तरेकडे चीन आणि पाकिस्तान यांच्या एकत्र आक्रमणाची भीती आहे. नक्षलवाद आणि दहशतवादाने देश अजूनही पोखरला गेला आहे. त्या मुळे प्रगतीला खीळ बसत आहे. प्रांतीयवाद सुद्धा जोर धरू लागलेला आहे. ह्या दुहीचा आपण एकदा कटू अनुभव घेतला असून सुद्धा आपल्यामध्ये फरक पडत नाही. सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे गरिबी व बेकारीचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी पण वाढली आहे.
ह्या सर्व संकटांवर मात करून भारत अजूनही प्रगतीच्या दिशेने जात आहे. नक्कीच भारताचे सुवर्ण युग पुन्हा येण्याची आशा निर्माण झाली आहे.
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV
Majha Bharat Desh Mahan, My Country India Essay Composition
Related posts, 22 thoughts on “my country essay in marathi, maza bharat desh nibandh, my india देश”.
thanks for essay! excellent use of words.
superb eassy
maaza pragat bharat nibandh pathva
Very very very very very good essay
हा निबंध मी माझ्या शुद्धलेखनाच्या पुस्तकांमध्ये राईत केला हा निबंध मला खूप आवडला.
“Me Bharat desh bolato ahe” ya vishayacha nibandh pathva
Very nice eassy
It’s really phenomenal…it helped me a lot…thank you lovely essay
its a superb essay it helped me a lot thank you so much keep it up…
Yes, it is good it helps me
A very good essay
Excellent essay…Have not read better than this
Great information you are doing great work keep it up
Very good thank you
Very good essay
A good essay
Very very nice
Thanks for essy
Thank you very much for the lovely essay
Thank you for essay
Leave a Reply Cancel reply
Your email address will not be published. Required fields are marked *
IMAGES
VIDEO
COMMENTS
माझा भारत देश महान निबंध मराठी | Maza Bharat Desh Mahan Nibandh In Marathi. भारतीय नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. मी ज्या देशांमध्ये राहतो त्या देशाचे नाव ...
Set 3: माझा देश भारत निबंध मराठी – Maza Desh Bharat Nibandh Marathi. माझ्या देशाचे नाव भारत आहे. देशात शंभर करोड पेक्षा जास्त स्त्री-पुरुष-बालके राहातात.
Bharat Desh Mahan Nibandh Marathi: आपला भारत देश हा विशाल आहे. भारताच्या उत्तरेस हिमालय, पश्चिमेस अरबी समुद्र, आणि दक्षिणेस हिंदी महासागर आहे.
National Integrity Essay in Marathi | Rashtriya Ekatmata Importance 22 thoughts on “My Country Essay in Marathi, Maza Bharat Desh Nibandh, My India देश” Kaustubh Sep 2, 2020 at 2:36 pm